Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ अर्पण करण्यावर बंदी

मुंबई: भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने (Siddhivinayak Temple) मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आज, रविवारी पासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. हा नियम आज दिनांक ११ मे पासून लागू झाला असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.


भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय


मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे की मंदिरात प्रसाद म्हणून नारळ आणि फुलांच्या हार अर्पण केले जाणार नाहीत.

मंदिराचे विश्वस्त भास्कर शेट्टी म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आम्हाला नारळ आणि इतर नैवेद्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा स्वर्णकर म्हणाले की, दररोज हजारो भाविक मंदिराला भेट देतात आणि ते दहशतवाद्यांच्या 'हिटलिस्ट'मध्ये समाविष्ट आहे.

अन्य मंदिर ट्रस्टकडून संमिश्र प्रतिक्रिया


या निर्णयावर शहरातील इतर मंदिर ट्रस्टकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विजय गपचप यांनी स्थानिक विक्रेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली. "या निर्णयामुळे अनेक लहान व्यवसायांना त्रास होईल. आम्ही त्याऐवजी सुरक्षा मजबूत करण्याचा आणि तपासणी प्रक्रिया वाढवण्याचा पर्याय निवडत आहोत." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर बाबुलनाथ मंदिर चॅरिटीजचे अध्यक्ष नितीन ठक्कर यांनी मंदिरात अशा प्रकारची बंदी लागू करणार नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमध्यमाला दिली.  बाबूलनाथ मंदिरात सिद्धिविनायक मंदिरासारखी गर्दी होत नाही. तसेच  आमच्याकडे आधीच कडक स्क्रीनिंग प्रोटोकॉल आहेत. असे पुढे म्हणाले.

यापूर्वी, पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील कडक पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे.  मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.


 
Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता