
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक बोलावली. आज दुपारी होणाऱ्या बैठकीचा उद्देश सध्याच्या घटनाक्रम पाहता स्थितीचे आकलन करणे आणि संपूर्ण राज्यात सुरक्षा उपायांची समीक्षा करणे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गुरूवारी सांगितले होते की सुरक्षेबाबत एक बैठक होईल. पोलीस तयार आहेत आणि लोकांना सतर्क करण्यासाठी मॉक ड्रिल केली जात आहे.
महाराष्ट्रात अलर्ट
विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईकनंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवर पोलिसांचा अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द
गेट वे ऑफ इंडियासह महत्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हायअलर्ट आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.