भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

  98

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला निष्फळ ठरवले आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शनने या हल्ल्यांना परतून लावले. पाकिस्तानच्या हल्ल्याने भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला होता. भारतीय सुरक्षा रक्षकांनी पाकिस्तानच्या अत्याधुनिक विमान F 16 आणि JF 17 पाडले.



पाकिस्तानचे ५० ड्रोन उद्धवस्त


सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारताच्या अनेक ठिकाणी दणादण अनेक ड्रोन डागण्यात आले. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून ५० पेक्षा अधिक ड्रोन हवेत मारण्यात आले. L-70 गन, Zu-23mm, शिल्का सिस्टम आणि इतर अॅडव्हान्स हत्यारांनी पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना उद्ध्वस्त केले.


 


जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू


गेल्या रात्री पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने हल्ला सुरू केला आहे. उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला आहे.



भारतीय लष्कराचे विधान


भारतीय लष्कराने सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले की पाकिस्तानच्या सैन्याने ८ आणि ९ मेच्या दरम्यान रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र पाकिस्तानचे हे हल्ले परतून लावले आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.





Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या