शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनीच हे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, आमच्या पक्षात दोन विचारधारा आहेत. एक गट अजित पवारांसोबत यायला इच्छुक आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट नाव घेऊन म्हटलं की, "एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून घ्यावा."


हे वक्तव्य म्हणजेच फुटलेले दोन्ही गट परत एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे. अजित पवारांकडे आमदारांची संख्या, तर शरद पवारांकडे पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय ओळख आहे. दोघे एकत्र आले, तर पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकतो.



गेल्या काही महिन्यांत गुप्त भेटी, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, आणि आता हे सूचक विधान, त्यामुळेच काका-पुतण्याच्या 'री-युनियन'ची जोरदार चर्चा सुरू आहे.


शरद पवारांनी ‘INDIA’ आघाडीच्या कार्यक्षमतेवरही टीका केली आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकतेकडे वाटचाल होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व

होळीचा सण आलाय, महिला बचत गटाच्या पुरणपोळीसाठी महापालिकेची मार्केटिंग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : होळीचा सण जवळ आला की सारेच जण ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, अशी हाळी देतात. मुंबईकरांना