शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनीच हे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, आमच्या पक्षात दोन विचारधारा आहेत. एक गट अजित पवारांसोबत यायला इच्छुक आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट नाव घेऊन म्हटलं की, "एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून घ्यावा."


हे वक्तव्य म्हणजेच फुटलेले दोन्ही गट परत एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे. अजित पवारांकडे आमदारांची संख्या, तर शरद पवारांकडे पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय ओळख आहे. दोघे एकत्र आले, तर पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकतो.



गेल्या काही महिन्यांत गुप्त भेटी, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, आणि आता हे सूचक विधान, त्यामुळेच काका-पुतण्याच्या 'री-युनियन'ची जोरदार चर्चा सुरू आहे.


शरद पवारांनी ‘INDIA’ आघाडीच्या कार्यक्षमतेवरही टीका केली आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकतेकडे वाटचाल होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२