शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनीच हे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, आमच्या पक्षात दोन विचारधारा आहेत. एक गट अजित पवारांसोबत यायला इच्छुक आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट नाव घेऊन म्हटलं की, "एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून घ्यावा."


हे वक्तव्य म्हणजेच फुटलेले दोन्ही गट परत एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे. अजित पवारांकडे आमदारांची संख्या, तर शरद पवारांकडे पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय ओळख आहे. दोघे एकत्र आले, तर पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकतो.



गेल्या काही महिन्यांत गुप्त भेटी, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, आणि आता हे सूचक विधान, त्यामुळेच काका-पुतण्याच्या 'री-युनियन'ची जोरदार चर्चा सुरू आहे.


शरद पवारांनी ‘INDIA’ आघाडीच्या कार्यक्षमतेवरही टीका केली आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकतेकडे वाटचाल होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा