Pawandeep Accident : पवनदीप राजनची प्रकृती अजून गंभीर; दोन्ही पाय फ्रॅक्चर, डोक्यालाही गंभीर दुखापत

मुंबई : इंडियन आयडॉल १२ चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप राजनचा सोमवारी पहाटे सडेतीनच्या सुमारास अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला आहे. आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पवनदीपचे चाहते सोशल मीडियावरून त्याच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेक कलाकार आणि इंडियन आयडॉलचे स्पर्धकही त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.


या प्रकरणावर इंडियन आयडॉल १२ मधील दुसरी रनर-अप सायली कांबळे हिने झूम/टेली टॉक इंडिया या माध्यमाशी बोलताना सांगितले, “मी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. पण मला त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्याची परवानगी नाही.मी फक्त एवढंच म्हणू शकते की, त्याचे लवकरात लवकर स्वास्थ्य सुधारावे, हीच प्रार्थना आहे.”



या प्रकरणावर इंडियन आयडॉल १२ मधील दुसरी रनर-अप सायली कांबळे हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. झूम/टेली टॉक इंडिया या माध्यमाशी बोलताना सायलीने सांगितले की, “मी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. पण मला त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्याची परवानगी नाही. मी फक्त एवढंच म्हणू शकते की, त्याचे लवकरात लवकर स्वास्थ्य सुधारावे, हीच प्रार्थना आहे.”


सध्या सोशल मीडियावर पवनदीपचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर आहे आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.प्राथमिक उपचारानंतर, पवनदीप आणि त्याच्या दोन्ही मित्रांना पुढील उपचारांसाठी नोएडाला हलविण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनदीपचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे.


पवनदीप राजनने २०२१ साली इंडियन आयडॉल १२ जिंकत संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. फिनालेमध्ये त्याने अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल टौरो आणि शन्मुखप्रिया यांना मागे टाकून विजेतेपद मिळवले. त्याने विजेतेपदासोबत एक कार आणि २५ लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले होते. त्याने याआधी २०१५ साली द व्हॉईस इंडिया ही स्पर्धाही जिंकली होती. त्यावेळी प्रसिद्ध गायक शान हे त्याचे मेंटॉर होते. त्या स्पर्धेतही त्याने ५० लाख रुपये आणि एक कार मिळवली होती.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून