“सिंधूचे पाणी आता देशाच्या उपयोगी पडेल”- पंतप्रधान

नवी दिल्ली : पूर्वी भारताचे पाणी बाहेर जात असे. परंतु, आता देशाच्या हिसासाठी वापरले जाईल आणि आपल्या हिताचे ठरेल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सिंधू पाणी करार संपुष्टात आणल्यानंतर पंतप्रधानांनी आज, मंगळवारी पहिल्यांदाच यासंदर्भात सार्वजनिक विधान केले आहे.


यासंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील आणि देशासाठी उपयुक्त ठरेल. जे पाणी पूर्वी भारताच्या सीमेबाहेर वाहत होते ते पाणी आता भारत सरकार थांबवून देशाच्या हितासाठी वापरण्याची योजना आखत आहे.


एक काळ असा होता की कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यापूर्वी लोक जग काय विचार करेल याचा विचार करायचे. ते विचार करायचे की त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब झाला. कोणताही देश अशा प्रकारे पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपण राष्ट्राला प्रथम स्थान देतो तेव्हाच देशाची प्रगती होते असे पंतप्रधानांनी सांगितले. सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) घेतला. भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील. या कराराच्या स्थापनेपासून भारताने पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यावर व्हेटो केला आहे.


सिंधू पाणी करारांतर्गत, भारत 1960 पासून सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्याचा मोठा वाटा पाकिस्तानला देत आहे, तर भारत सतलज, रावी आणि बियास नद्यांचे पाणी वापरतो. परंतु अलिकडच्या काळात भारताने आपल्या वाट्याचे पाणी पुरेपूर वापरावे जेणेकरून देशातील शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.

Comments
Add Comment

Central Railway : पुरुषांनो लक्ष द्या! महिलांच्या डब्यात पाय ठेवला तर दंड अन् थेट... मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन

Faridabad Teacher Murder : बाप रे...३२ सेकंदात ३४ सपासप वार करून महिलेची निर्घृण हत्या; सर्व घटना CCTV मध्ये कैद, फरिदाबाद हादरले!

फरिदाबाद : एका बाजूला पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना, दुसऱ्या बाजूला विद्यादानाच्या पवित्र भूमीत

Punjab Terror Plot : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला! ISI शी संबंध असणाऱ्या चार अल्पवयीनांसह ९ जण जेरबंद

चंदीगड : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Punjab Terror Plot) घडवून आणण्याचा कट पंजाब पोलिसांनी वेळेत उधळून लावत मोठी कारवाई