
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हक्क सांगत एक महिला सुप्रीम कोर्टात पोहोचते, आणि म्हणते, 'मी मुघलांची वंशज आहे... लाल किल्ला आमचाच आहे!'
कोलकात्याच्या सुलताना बेगम नावाच्या महिलेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लाल किल्ल्यावर मालकी हक्क मागितला. वर म्हणाली, 'किल्ला नसेल द्यायचा, तर पैसे तरी द्या!' पण कोर्टाने तिचा दावा फेटाळत खडसावलं, 'फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्री का नाही?'
१८५७ च्या बंडात ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरला हाकलून लाल किल्ला ताब्यात घेतला, आणि आता जवळपास १६८ वर्षांनंतर त्याच्या वंशजाने ताबा मागितला? हे म्हणजे इतिहासाचे नवे पुरावे घेऊन न्यायालयात भावना विकण्याचा प्रयत्न!

मध्य प्रदेश: उज्जैनच्या महाकाल मंदिर (Ujjain Mahakal Temple) परिसरात अचानक मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या शंख ...
सरकारनं पूर्वी पेन्शन दिली होती, ती कमी वाटू लागल्यावर आता थेट लाल किल्ल्यावर दावा? दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीच ही याचिका फेटाळली होती, पण तरीही सुलताना बेगम थेट सुप्रीम कोर्टात गेल्या. तिथेही कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं, "तुमचा दावा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे. आम्ही ती याचिका फेटाळत आहोत!"
"Why only Red Fort and not Fatehpur Sikri also?" Supreme Court rejects Mughal heir's plea for Red Fort possession
Read story here: https://t.co/U7nFtIS8lw pic.twitter.com/woQ5910Txv
— Bar and Bench (@barandbench) May 5, 2025
देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या लाल किल्ल्यावर असा बिनबुडाचा दावा करणं म्हणजे जनतेच्या इतिहासाची थट्टा नाही का? आज जर अशा याचिका चालू दिल्या, तर उद्या ताजमहल, कुतुबमिनार, अजिंठा-एलोरा सुद्धा कुणी तरी घेऊन बसतील!
देशाची वास्तू काही वारशाच्या नावावर चालत नाही, ती जनतेच्या अभिमानावर चालते.