पहलगाम हल्ल्यावर पुतिन यांचा मोदींना फोन, म्हणाले "प्रत्येक कारवाईला पूर्ण पाठिंबा"

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पूर्ण पाठिंबा


नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या (India pakistan Tension)तणावादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.  जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी यावेळी निषेध केला, आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, मोदी आणि पुतीन संभाषणादरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी हल्ल्यामागील आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे यावर भर दिला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी पुतिन यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.



वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना केले आमंत्रित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदीं यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले. यापूर्वी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.



भारत-पाकिस्तान परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सोमवारी बंद दाराआड बैठक होणार आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत, ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि राजनैतिक संबंध मर्यादित करणे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.