पहलगाम हल्ल्यावर पुतिन यांचा मोदींना फोन, म्हणाले "प्रत्येक कारवाईला पूर्ण पाठिंबा"

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पूर्ण पाठिंबा


नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या (India pakistan Tension)तणावादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.  जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी यावेळी निषेध केला, आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, मोदी आणि पुतीन संभाषणादरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी हल्ल्यामागील आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे यावर भर दिला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी पुतिन यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.



वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना केले आमंत्रित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदीं यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले. यापूर्वी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.



भारत-पाकिस्तान परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सोमवारी बंद दाराआड बैठक होणार आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत, ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि राजनैतिक संबंध मर्यादित करणे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत