शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर 'सर्वोच्च' सुनावणी

नवी दिल्ली : पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या वादावर तोडगा काढून निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले. या निर्णयांविरोधात उद्धव आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मे महिन्यात उद्धव आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे


उद्धव गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे / शिउबाठा) शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.


शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार / राशप) राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घड्याळ वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला