Dride Fish : सुकी मासळी खवय्यांच्या खिशाला फटका! सुक्या बोंबीलने खाल्ला भाव

महिलांचा ओले बोंबील विकण्याकडे कल


मुंबई : ओल्या मासळीएवढीच सुक्या मासळीलाही (Dride Fish) खवय्यांची मोठी पसंती असते. त्यातही सुक्या बोंबीलला (Bombay Duck) सर्वाधिक मागणी असते; परंतु सध्या मच्छीमारांचा सुके बोंबील तयार करण्याकडे कल कमी झाला आहे. सुक्यापेक्षा ओल्या बोंबीलला भाव चांगला मिळू लागल्याने मच्छीमार तोच बाजारात विक्रीसाठी पाठवत असून सुके बोंबील विक्रीसाठी येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. सुक्या मासळीमध्ये जवळा, करंदी व सुक्या बोंबीलला मागणी असते. विशेष करून, पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने खवय्ये सुक्या मासळीची बेगमी करून ठेवतात. त्यामुळे पावसाळ्याचे दोन महिने सहज निघून जातात; मात्र सुकी मासळी पावसाळ्यातच नाही तर एरवीदेखील चवीने खाल्ली जाते. मच्छीमार महिला आठवड्याच्या बाजारात पहाटेपासूनच या मासळीची विक्री करण्यासाठी येतात. भाईंदर पश्चिमेकडे दर रविवारी सुक्या मासळीचा बाजार भरतो. भाईंदरच नव्हे तर आसपासच्या गावातील रहिवासीदेखील सुक्या मासळीच्या व विशेष करून सुके बोंबील खरेदीसाठी येतात.



मच्छीमारांनी समुद्रातून मासळी आणली की महिला त्यांची वर्गवारी करतात. त्यातील बोंबील, करंदी व जवळा वेगळा करून सुकायला टाकला जातो. करंदी, जवळा जमिनीवर अंथरून सुकवला जातो; मात्र बोंबील सुकविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. बोंबील सुकविण्यासाठी समुद्रकिनारी बांबू बांधले जातात, मग एकेक बोंबील त्यावर सुकविण्यासाठी टाकले जातात. बांबूवर वाळलेले बोंबील गोळा करून ते पुन्हा जमिनीवर सुकविण्यासाठी पसरवले जातात. त्यानंतर वाळवून कडक झालेले बोंबील गोळा करून त्याची साठवणूक केली जाते. हे बोंबील त्याच्या प्रतीनुसार बाजारात शेकडा शंभर ते दोनशे रुपयांना विकले जातात. ओल्या बोंबीललाही खवय्यांची पसंती असते. याआधी ओल्या बोंबीलला ५०० रुपये प्रती ५० किलो असा दर मिळत होता; मात्र ओल्या बोंबीलला बाजारात प्रचंड मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे ओल्या बोंबीलची ५० किलोची पाटी आता तब्बल चार हजारांना विकली जाऊ लागली आहे. साहजिकच मच्छीमार महिलांचा ओले बोंबील विकण्याकडे कल वाढू लागला आहे.



परदेशातूनही मागणी


सुक्या बोंबीलला परदेशात, तसेच इतर राज्यांतही मोठी मागणी आहे. भारतातून परदेशात स्थायिक झालेले सुक्या बोंबीलची मागणी करतात व त्यांचे येथील नातेवाईक ते जमेल त्या मार्गाने सुके बोंबील पाठविण्याची व्यवस्था करतात. उत्तर भारतात, उत्तर प्रदेश व बिहार आदी राज्यातही सुक्या बोंबीलला चांगली मागणी आहे; मात्र बाजारात सुके बोंबील विक्रीला येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे