NEET Exam 2025: काही मिनिटांच्या उशिरामुळे २ विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला, वर्ष वाया जाण्याची भीती

नाशिक:  मेडिकल अभ्यासक्रमांसाठी महत्वाची असलेली NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा संपूर्ण देशभरात आज ५ मे २०२५ रोजी पार पडली. देशभरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. दरम्यान नाशिकमधून एक बातमी समोर आली आहे, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटं विलंब झाल्यामुळे दोन विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले आहे.


परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही केवळ काही मिनिटांच्या उशिरामुळे या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला.



राष्ट्रीय नियमांतर्गत प्रवेश नाकारला


परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार, परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान १.३० वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक असल्याचे सूचना पत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या काही मिनिटांनंतर पोहोचल्या. त्यांना निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीर झाला होता. दरम्यान विद्यार्थिनींनी परीक्षेला बसू देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे विनंती देखील केली होती. मात्र परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्या कारणामुळे त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थिनींचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला