NEET Exam 2025: काही मिनिटांच्या उशिरामुळे २ विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला, वर्ष वाया जाण्याची भीती

नाशिक:  मेडिकल अभ्यासक्रमांसाठी महत्वाची असलेली NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा संपूर्ण देशभरात आज ५ मे २०२५ रोजी पार पडली. देशभरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. दरम्यान नाशिकमधून एक बातमी समोर आली आहे, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटं विलंब झाल्यामुळे दोन विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले आहे.


परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही केवळ काही मिनिटांच्या उशिरामुळे या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला.



राष्ट्रीय नियमांतर्गत प्रवेश नाकारला


परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार, परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान १.३० वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक असल्याचे सूचना पत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या काही मिनिटांनंतर पोहोचल्या. त्यांना निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीर झाला होता. दरम्यान विद्यार्थिनींनी परीक्षेला बसू देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे विनंती देखील केली होती. मात्र परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्या कारणामुळे त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थिनींचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी