
भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या घटनेने भिवंडी परिसर हादरले आहे .
भिवंडी शहरातील फेणे गावात लालजी बनवारीलाल भारती हा यंत्रमाग कामगार आपल्या कुटुंबासोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

मुंबई : मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. आपल्या चित्रपटाची कथा लोकांपर्यंत पोहचावी यासाठी चित्रपटाची टीमही तितकीच मेहनत घेत असते. वीजी ...
लालजीच्या पत्नीने ३ मुलींसह आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे.
दरम्यान नक्की महिलेने कोणत्या कारणास्तव आपल्या मुलींसह ही आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट नसून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.