पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कायमस्वरूपी बंद होण्याच्या उंबरठ्यावर? कारण काय?

  151

कराची : भारताच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव चिघळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने ३० एप्रिलपासून पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) या आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीला आणखी अडचणीत टाकलं आहे.







PIA समोरील संकट गंभीर


पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले आकाशमार्ग बंद केले होते. त्याचाच प्रतिउत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानसाठी हे पाऊल उचललं. या निर्णयामुळे PIA ला अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरिता लांबचा मार्ग निवडावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी, इंधन खर्च आणि एकूणच ऑपरेशनचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.




PIA ची क्वालालंपूर, सोल, ढाका, हनोई आणि बँकॉकसारख्या ठिकाणी जाणारी विमानं यापूर्वी भारताच्या हवाई क्षेत्रातून जात होती. आता त्यांना चीन, लाओस, थायलंडमार्गे लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकेकाळच्या प्रतिष्ठित PIA ची उड्डाणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.







उत्तर भागातली उड्डाणेही बंद


३० एप्रिल रोजी PIA ने गिलगिट, स्कार्दू आणि इतर उत्तर भागातील उड्डाणेही तात्पुरत्या स्वरूपात थांबवली आहेत. या भागात रस्तेमार्ग नीट विकसित नसल्याने लोक हवाई सेवांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रवाशांसोबतच मालवाहतूकही ठप्प झाली आहे. PIA कडून यासाठी कोणतंही अधिकृत कारण दिलं गेलेलं नाही, पण आर्थिक अडचणींमुळेच ही सेवा थांबवावी लागल्याचं समजतं.







खाजगीकरणाचा अयशस्वी प्रयत्न


PIA ला वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून खाजगीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या बोलीत अपेक्षित किंमत मिळाली नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न करूनही तो अयशस्वी ठरला. सरकारने गुंतवणूकदारांना १००% मालकी व पूर्ण नियंत्रण देण्याचं आश्वासन दिलं होतं, तरीही विश्वासाचा अभाव आणि वाढते भू-राजकीय धोके यामुळे कोणीच पुढे आलं नाही.







भारताच्या बंदीचा थेट परिणाम


PIA च्या एकूण ३०८ आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी बहुतांश पश्चिम आशियात जात असले तरी आग्नेय आशियाच्या मार्गांवर बंदीचा थेट परिणाम झाला आहे. एकेकाळी आशियातील आघाडीची विमान कंपनी म्हणून ओळख असलेली PIA आता टिकवण्यासाठी धडपड करतेय. भारतीय हवाई क्षेत्र बंद झाल्याने ती आणखी अडचणीत सापडली आहे.







PIA चं भविष्य काय?


PIA ची वर्तमान आर्थिक परिस्थिती, सरकारच्या खाजगीकरणातील अपयश आणि भारताने लावलेली हवाई बंदी – या सगळ्यामुळे कंपनीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. जर ही स्थिती कायम राहिली, तर भविष्यात PIA ला कायमस्वरूपी बंद करावं लागू शकतं, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.






थोडक्यात, भारताने घेतलेला हा राजकीय आणि रणनीतिक निर्णय केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पाकिस्तानच्या विमान वाहतूक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

एलॉन मस्कची मोठी घोषणा, अमेरिकेत बनवणार तिसरा पक्ष, ट्रम्प यांना देणार टक्कर

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या २४९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना बहुचर्चित वन बिग

Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या

Nehal Modi Arrested: पीएनबी घोटाळ्यात भाऊ नीरवला मदत करून नेहल अशाप्रकारे अडकला, EDने अमेरिकेत मुसक्या आवळल्या

वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँक (PNB Bank Scam) घोटाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) चा भाऊ नेहल दीपक मोदी  (Nehal Modi)

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन डी. सी. : हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा धाकट भाऊ नेहल याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार; २४ जणांचा बळी, २० हून अधिक मुली बेपत्ता!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक पूरस्थितीने भीषण हाहाकार माजवला

मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाकिस्तानमधील कार्यालय केले बंद

इस्लामाबाद : सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले