Railway Megablock : मध्य व पश्चिम रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’ रद्द! नेमके कारण काय?

मुंबई : प्रत्येक आठवड्याच्या रविवार दिवशी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी देखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंत्रणा दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असल्याचे जाहीर केले होते. मात्र रविवार ४ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला आहे.



वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट (एनईईटी-२०२५) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. ४) रोजीचा उपनगरीय मार्गांवर नियोजित असलेला मेगा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नीट परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रवासात अडथळा येणार नाही.



पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक


पश्चिम रेल्वेनेदेखील रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप व डाऊन फास्ट लाइनवर शनिवारी (ता. ३) मध्यरात्री १२.१५ ते ४.१५ दरम्यान चार तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या वेळी जलद गाड्या सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात