भारताच्या इतिहासाशी गद्दारी, ज्यांनी प्राण गमावले त्या भारतीय सैनिकांचा अपमान?

‘तर ईशान्य भारत ताब्यात घ्या!’ - बांगलादेशच्या सल्लागाराची भारताविरोधात गरळ


ढाका : १९७१ मध्ये भारताने रक्त सांडलं... हजारो सैनिकांनी प्राण गमावले... आणि बांगलादेशाला दिलं स्वातंत्र्य! पण आज, त्याच भारताला पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बांगलादेशातून ऐकू येतेय!


बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे जवळचे आणि माजी लष्करी अधिकारी ए.एल.एम. फजलूर रहमान यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्यांवर ताबा मिळवावा,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहून थेट चीनबरोबर लष्करी कारवाईचीही चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.



ही पोस्ट केवळ वादग्रस्त नाही, तर भारताच्या इतिहासाशी गद्दारी करणारी आहे. कारण ज्याचं स्वातंत्र्य भारताने मिळवून दिलं, तो देश आता भारतविरोधी भाषा बोलतोय?



सरकारने दिलं तात्काळ स्पष्टीकरण


या विधानावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्पष्टीकरण दिलं असून, “ही वैयक्तिक मतं आहेत, सरकार याचं समर्थन करत नाही,” असं प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटलं. मात्र देशाच्या सल्लागार मंडळातील व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर संशय घेणं स्वाभाविक ठरतं.



चीनच्या दौऱ्यावरून काय स्पष्ट होतंय?


युनूस अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतातील सीमावर्ती राज्यांचा उल्लेख करत, “या भागातून चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेच फजलूर रहमान यांचं ही पोस्ट येणं, हे नुसतं योगायोग मानायचं का?


दरम्यान, भारत शांत आहे, पण दुर्बल नाही. भारतानं नेहमीच आपले शेजारी मित्र मानले... पण अशा धोरणांमुळे जर कोणी भारताची सहनशीलता परीक्षा घेत असेल, तर त्यांना इतिहासाची उजळणी करावी लागेल.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल