भारताच्या इतिहासाशी गद्दारी, ज्यांनी प्राण गमावले त्या भारतीय सैनिकांचा अपमान?

‘तर ईशान्य भारत ताब्यात घ्या!’ - बांगलादेशच्या सल्लागाराची भारताविरोधात गरळ


ढाका : १९७१ मध्ये भारताने रक्त सांडलं... हजारो सैनिकांनी प्राण गमावले... आणि बांगलादेशाला दिलं स्वातंत्र्य! पण आज, त्याच भारताला पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बांगलादेशातून ऐकू येतेय!


बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे जवळचे आणि माजी लष्करी अधिकारी ए.एल.एम. फजलूर रहमान यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्यांवर ताबा मिळवावा,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहून थेट चीनबरोबर लष्करी कारवाईचीही चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.



ही पोस्ट केवळ वादग्रस्त नाही, तर भारताच्या इतिहासाशी गद्दारी करणारी आहे. कारण ज्याचं स्वातंत्र्य भारताने मिळवून दिलं, तो देश आता भारतविरोधी भाषा बोलतोय?



सरकारने दिलं तात्काळ स्पष्टीकरण


या विधानावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्पष्टीकरण दिलं असून, “ही वैयक्तिक मतं आहेत, सरकार याचं समर्थन करत नाही,” असं प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटलं. मात्र देशाच्या सल्लागार मंडळातील व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर संशय घेणं स्वाभाविक ठरतं.



चीनच्या दौऱ्यावरून काय स्पष्ट होतंय?


युनूस अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतातील सीमावर्ती राज्यांचा उल्लेख करत, “या भागातून चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेच फजलूर रहमान यांचं ही पोस्ट येणं, हे नुसतं योगायोग मानायचं का?


दरम्यान, भारत शांत आहे, पण दुर्बल नाही. भारतानं नेहमीच आपले शेजारी मित्र मानले... पण अशा धोरणांमुळे जर कोणी भारताची सहनशीलता परीक्षा घेत असेल, तर त्यांना इतिहासाची उजळणी करावी लागेल.

Comments
Add Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी भेट

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख

नेपाळमध्ये आता १६ वर्षांचे तरुणही मतदान करू शकणार

काठमांडू: नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी देशातील मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षांपर्यंत कमी

टायफून रागासा वादळामुळे तैवानमध्ये १४ जणांचा मृत्यू

चीनचे 20 लाख लोक स्थलांतरित हाँगकाँग : वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ, सुपर टायफून रागासा, मंगळवारी(दि. २३)

Pakistan AirStrike : मोठी बातमी, पाकिस्तानच्या J-१७ फायटर जेटने उडवली आपलीच घरं, अनेक जण ठार

खैबर पख्तूनख्वा : दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी उड्डाण केलेल्या पाकिस्तान एअरफोर्सने सोमवारी सकाळी प्रचंड

H-1B व्हिसा वाढीव शुल्क फक्त नवीन अर्जदारांनाच! अमेरिकेचे नवे स्पष्टीकरण

वॉशिंग्टन: ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू करण्याच्या घोषणेनंतर, H-1B व्हिसाच्या ७०% पेक्षा जास्त वाटा असलेल्या

अमेरिकेसह युरोपमधील तीन प्रमुख विमानतळांवर CYBER ATTACK

वॉशिंग्टन: आज शनिवारी युरोप देशात सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे युरोपीय देशात