भारताच्या इतिहासाशी गद्दारी, ज्यांनी प्राण गमावले त्या भारतीय सैनिकांचा अपमान?

‘तर ईशान्य भारत ताब्यात घ्या!’ - बांगलादेशच्या सल्लागाराची भारताविरोधात गरळ


ढाका : १९७१ मध्ये भारताने रक्त सांडलं... हजारो सैनिकांनी प्राण गमावले... आणि बांगलादेशाला दिलं स्वातंत्र्य! पण आज, त्याच भारताला पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बांगलादेशातून ऐकू येतेय!


बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे जवळचे आणि माजी लष्करी अधिकारी ए.एल.एम. फजलूर रहमान यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्यांवर ताबा मिळवावा,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहून थेट चीनबरोबर लष्करी कारवाईचीही चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.



ही पोस्ट केवळ वादग्रस्त नाही, तर भारताच्या इतिहासाशी गद्दारी करणारी आहे. कारण ज्याचं स्वातंत्र्य भारताने मिळवून दिलं, तो देश आता भारतविरोधी भाषा बोलतोय?



सरकारने दिलं तात्काळ स्पष्टीकरण


या विधानावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्पष्टीकरण दिलं असून, “ही वैयक्तिक मतं आहेत, सरकार याचं समर्थन करत नाही,” असं प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटलं. मात्र देशाच्या सल्लागार मंडळातील व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर संशय घेणं स्वाभाविक ठरतं.



चीनच्या दौऱ्यावरून काय स्पष्ट होतंय?


युनूस अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतातील सीमावर्ती राज्यांचा उल्लेख करत, “या भागातून चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेच फजलूर रहमान यांचं ही पोस्ट येणं, हे नुसतं योगायोग मानायचं का?


दरम्यान, भारत शांत आहे, पण दुर्बल नाही. भारतानं नेहमीच आपले शेजारी मित्र मानले... पण अशा धोरणांमुळे जर कोणी भारताची सहनशीलता परीक्षा घेत असेल, तर त्यांना इतिहासाची उजळणी करावी लागेल.

Comments
Add Comment

लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून

कुटुंबियांना वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलाची समुद्राशी झुंज; उसळत्या लाटा आणि त्यात....

पर्थ : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून आई, भाऊ आणि बहीण या

India EU Trade Deal: 'मदर ऑफ ऑल डील्स'ची पाकिस्तानाला भीती; पाकिस्तानातील नोकऱ्या संकटात येणार ?

पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज (Gohar Ejaz) यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचे

भीक मागण्याची लाज वाटते, शरमेने मान खाली जाते

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली इस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून

व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारताला ऑफर

वॉशिग्टन : गेल्या वर्षी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारतावर शुल्क लादले होते. आता, अमेरिका पुन्हा

बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले

१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठार बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन