ठाणेकरांनो, आजच पुरेसे पाणी भरून ठेवा!

  134

ठाणे शहरात काही भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद


ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून स्टेम होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी रात्री. ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


परिणामी, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते रा. ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी रा. ९ पासून शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९ वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील.


शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Sleep: शांत झोप हवी आहे? 'या' ५ फळांमुळे मिळेल गाढ झोप!

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात चांगली आणि पुरेशी झोप मिळवणं अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. अपुरी झोप अनेक

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

बीएमसीकडून आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा

मुंबई : मराठा समाजबांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका