एटीएमपासून ते रेल्वे तिकीटापर्यंत....आजपासून देशात लागू होतायत हे नवे बदल

नवी दिल्ली: आजपासून मे महिन्याची सुरूवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशात काही बदल लागू झाले आहेत ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर पाहायला मिळू शकतो. १ मे पासून देशात लागू झालेल्या नव्या नियमांवर नजर टाकल्यास आता १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. तसेच रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे.



एटीएममधून पैसे काढणे होणार महाग


आज १ मे २०२५ पासून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक चार्ज द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनपीसीआयच्या प्रस्तावावर फीस वाढवण्यास परवानगी दिली होती. अशातच पहिल्या तारखेपासून जर ग्राहक आपल्या होम बँकेव्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १७ रूपयांच्या ऐवजी १९ रूपये द्यावे लागतील. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासल्यास ६ रूपयांच्या ऐवजी ७ रूपये द्यावे लागतील.



रेल्वेने बदलला हा नियम


१ मे २०२५ पासून होणारा दुसरा बदल हा रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आता वेटिंग तिकीट केवळ सामान्य डब्यामध्ये मान्य असेल. म्हणजेच जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करू शकत नाही. तसेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड १२० दिवसांनी कमी होऊन ६० दिवस करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या