Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त म्हणतो, मी खरा भूत पाहिलाय अन् तेव्हा मी नशेतही नव्हतो!

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचा 'द भूतनी' हा चित्रपट १ मे पासून लोकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'आया रे बाबा' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरम्यान, गाण्याच्या प्रमोशन वेळी संजय दत्तला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्याने मजेशीर उत्तर दिली.


"आम्ही तुम्हाला रफ अँड टफ आणि दमदार भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र, जीवनात कधी भीती वाटलीये किंवा एखाद्या गोष्टीची भिती वाटलीये, असा कधी क्षण आलाय का?" असा सवाल संजय दत्त यांना विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय दत्त म्हणाला, "मी दोन-तीन वेळेस भूत पाहिले आहेत. एकदा मी निकला देखील बोललो होतो आणि एक माझ्या बिल्डिंगमध्ये कधी कधी लुंगी वाला रात्री २-३ वाजता उभा राहतो. तर असे अनुभव आले आहेत. तेव्हा मी नशेत देखील नव्हतो"



"द भूतनी" या चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या स्टोरीमध्ये एक झाड आहे, ज्यामध्ये एक भूतनी (मौनी रॉय) असते. संजय दत्त या "बाबा"च्या भूमिकेत आहे, तो भूताला पळवणारा आहे. चित्रपटात पाच अ‍ॅक्शन सीन्स आहेत, ज्यामध्ये संजय दत्त यांनी कोणत्याही बॉडी डबलचा वापर न करता स्वतः स्टंट्स केले आहेत.​ महाशिवरात्रीच्या दिवशी, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, "द भूतनी" चा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्ये संजय दत्त एका श्लोकाचा उच्चार करताना दिसतात, ज्यामुळे एक रहस्यमय वातावरण तयार होते.


टीझरमध्ये झाडावर वसलेली भूतनी आणि संजय दत्त यांच्यातील संघर्षाचे दृश्य दाखवले आहे.​ "द भूतनी" हा सिनेमा संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव देणारा आहे. जर तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीचा मसाला असलेल्या फिल्म्स आवडत असतील, तर ही फिल्म नक्कीच पाहण्यासारखी आहे.​

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून