बत्ती गुल, युरोपमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे पसरला अंधार

स्पेन : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये अंधार पसरला आहे. स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगाल या तीन देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. तिन्ही देशांमध्ये रेल्वे, मेट्रो, रस्ते, विमान वाहतूक पुरती कोलमडली आहे. विमानतळांवर तसेच मेट्रो आणि रेल्वेच्या स्थानकांवर गोंधळाची परिस्थिती आहे. वेगवेगळ्या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. सिग्नल यंत्रणा ठप्प झाली आहे.



इबेरियन द्वीपकल्पात वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर संपूर्ण पॉवर ग्रिड संकटात सापडली. स्पॅनिश ग्रिड ऑपरेटर रेड इलेक्ट्रिका यांनी प्रादेशिक ऊर्जा कंपन्यांच्या मदतीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. युरोपियन ऊर्जा उत्पादक आणि ऑपरेटर्सच्या समन्वयाने, ऊर्जा पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोर्तुगालच्या आरईएन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.



अनेक ठिकाणी लिफ्ट बंद पडल्या. रुग्णालयांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅटऱ्या (टॉर्च) घेऊन पोलिसांना ठिकठिकाणी बंदोबस्ताला उभे राहावे लागले.
Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात