दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीला ६ विकेटनी हरवले. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात आरसीबीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १६२ धावा केल्या होत्या. या विजयासह आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत.
आरसीबीकडून कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी कमालीची फलंदाजी केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच आरसीबीला हा विजय साकारता आला. कृणालने या सामन्यात नाबाद ७३ धावा तडकावल्या. तर विराट कोहलीने ५१ धावांची खेळी केली.
दिल्लीकडून लोकेश राहुलने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. अभिषेक आणि फाफ डू प्लेसिस यांनी सुरूवात चांगली करून दिली. मात्र अभिषेक पोरेल २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर करूण नायर स्वस्तात परतला. त्याने केवळ ४ धावा केल्या. प्लेसिसनेही २२ धावा ठोकल्या आणि तो बाद झाला. तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने एकीकडे किल्ला लढवत असताना ४१ धावा ठोकल्या. त्याने ३९ बॉलमध्ये ३ चौकार ठोकत ही धावसंख्या केली. कर्णधार अक्षऱ पटेलला १५ धावाच करता आल्या.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…