Thursday, October 23, 2025
Happy Diwali

भारताने दिला पहिला दणका, लष्कर - ए - तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

भारताने दिला पहिला दणका, लष्कर - ए - तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला पहिले मोठे यश मिळाले आहे.
ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर - ए - तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.
अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर शुक्रवार २५ एप्रिल रोजी भारतीय सुरक्षा पथकाने बांदीपोरात लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा