पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा मोठा फटका बसला आहे. या हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, आपले आगाऊ तिकीट रद्द करत आहे. दरम्यान माता वैष्णवदेवीच्या भाविकांची (Vaishno Devi Devotees) संख्याही घटली आहे.
हॉटेल व्यवसायिकांना फटका
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांनी आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे हॉटेल्स आणि इतर सेवांच्या बुकिंगमध्ये घट झाली आहे.
वैष्णवदेवीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं आवाहन हॉटेल चालकांकडून करण्यात येतंय, तसेच तीर्थक्षेत्र सुरक्षित घोषित करण्यासाठी श्राइन बोर्ड सक्रिय आहे. मात्र तरीही पर्यटक बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे कटरा येथील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हे असेच चालू राहिले तर, हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे घोडेस्वार, पोर्टर आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांना देखील येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे.