मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

  47

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगद्याचे काम मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे, अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ३.४ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम 'दिशा' या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास १.६५ किमी लांबीचा हा मार्ग आहे.


आता दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. दुसऱ्या बोगद्याचे केवळ १०० मीटरचे काम शिल्लक असून, या मार्गिकेचा हा अवघड टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी दीड वर्ष लागतील, असा अंदाज आहे. सद्य:स्थितीत या मेट्रो ७ अ मार्गिकेची ५९ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र