मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगद्याचे काम मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे, अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ३.४ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम ‘दिशा’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास १.६५ किमी लांबीचा हा मार्ग आहे.

आता दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. दुसऱ्या बोगद्याचे केवळ १०० मीटरचे काम शिल्लक असून, या मार्गिकेचा हा अवघड टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी दीड वर्ष लागतील, असा अंदाज आहे. सद्य:स्थितीत या मेट्रो ७ अ मार्गिकेची ५९ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार आहे.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

20 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

45 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago