SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. सनरायजर्स हैदराबाद घरच्या मैदानावर खेळणार आहे. सलग ३ सामन्यात मुंबई इंडियन्स हा संघ विजयी झाला आहे. तर सनरायजर्स हैदराबादच्या विजयात सातत्याचा अभाव आहे. त्यांची फलंदाजी व गोलंदाजीही चांगली होत नाही.


सध्या हा संघ गुण तालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. सात सामन्यात फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, कर्णधार पॅट कमिन्स, इशान किशन, मोहम्मद शामी, हर्शल पटेल अॅडम मार्कम, भ्ुवनेश्वर कुमार असे चांगले खेळाडू असूनही त्यांना विशेष प्रभाव पाडता आला नाही. मुंबई इंडियन्स हा संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्यांची गोलंदाजी व फलंदाजी चांगली होत आहे.


रोहित शर्माला सूर गवसलेला आहे त्याने चेन्नई विरुद्ध ४५ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली तसेच सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली चेन्नईवर सहज विजय मिळविला. रायन रिकल्टन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, विल जॅक्स नमन धीर असे सरस फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. तसेच गोलंदाजीतही टेंट बोल्ट, जसप्रित बुमराह, दिपक चहर, मिचेल सँटनर,अश्वनी कुमार असे गोलंदाज आहेत. सनरायजर्स हैदराबाद घरच्या मैदानावर चमत्कार करुन मुंबई इंडियन्सचा विजयी रथ रोखतोका ते पाहूया.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण