Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीचंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा 'येलो अलर्ट'

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४ एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस सर्वाधिक उष्णतामानाची नोंद

सोमवारी चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस सर्वाधिक उष्णतामानाची नोंद झाली.हे देशातीलच नव्हे ,तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाने चंद्रपूरकरांना अक्षरश हैराण केले आहे. ऊनापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी आवर्जून घातली जात आहे. काही दिवसात पारा चांगलाच वाढला असून सोमवारी ब्रम्हपुरीचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचला.दरम्यान जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -