हिर्‍यांचा व्यवहार की फसवणुकीचा सापळा? नक्की काय घडलं?

२ कोटींची रक्कम दिली, पण न हिरा मिळाला… ना पैसे परत! मुंबईत गुन्हा दाखल


मुंबई : व्यवसायात पारख असते, पण विश्वासाचं काय? तो तुटला… तेही तब्बल २ कोटी रुपयांवर! एका हिरा व्यापाऱ्याने एका कंपनीकडून दागिन्यांचे व्यवहार करताना घेतलेला निर्णय त्याच्यावर जणू आर्थिक आघात ठरला आहे.


मुंबई पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात आणि त्यांच्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कथितपणे ४८ वर्षीय हीरा व्यापाऱ्याला ५ कॅरेट म्हणजे तब्बल ६० सोलिटेअर्स पुरवण्याचं आमिष दाखवून २ कोटी रुपये उकळले.



नेमकं काय घडलं?


हीरा व्यापाऱ्याची ओळख प्रवीण पटेल नावाच्या परिचिताच्या माध्यमातून चिराग कोठारी, निमीश कोठारी आणि परवेज मन्सुरी या तिघांशी झाली. व्यवहार ठरला. व्यापाऱ्याने विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीच्या खात्यात संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले.



पण नंतर काय?


ना हिर्‍यांचा पत्ता, ना पैशांचा मागमूस. वेळ गेली, अपेक्षा तुटली… आणि अखेर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.



कायद्यानं हात उगारला…


१७ एप्रिल रोजी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू केला आहे.


व्यवसायात विश्वास हवा, पण प्रत्येक व्यवहारात सावधगिरी हवीच. एक चूक आणि करोडोंचं नुकसान! आता पाहावं लागेल, या व्यापाऱ्याला न्याय मिळतो, की हिर्‍यांसारखीच ही आशा पण हरवते?




Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक