Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली होती. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू स्टुलवरून घसरून ती खाली पडल्यामुळे झाला असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. चिमुकलीचा हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे (Murder Case) उघड झाले आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्माची हत्या तिच्या १२ वर्षीय भावानेच केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)



या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारावर मृत मुलीच्या भावाची चौकशी केली असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी १८ वर्षाखालील आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.



नेमके प्रकरण काय?


गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले. वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबात ही घटना घडली. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा ही तिच्या आई-वडील आणि भावासह राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. यावेळी अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्याने गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले. (Vasai Crime)


याप्रकारानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर येताच अंजलीचा अपघात नाही तर हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अंजलीच्या भावाची चौकशी केली असता त्याने अंजलीसोबत झालेल्या एका किरकोळ वादाच्या रागात तिच्या डोक्यात थेट पक्कड घातली आणि तिचा खून झाला, असे समोर आले.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड