Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली होती. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू स्टुलवरून घसरून ती खाली पडल्यामुळे झाला असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. चिमुकलीचा हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे (Murder Case) उघड झाले आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्माची हत्या तिच्या १२ वर्षीय भावानेच केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)



या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारावर मृत मुलीच्या भावाची चौकशी केली असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी १८ वर्षाखालील आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.



नेमके प्रकरण काय?


गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले. वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबात ही घटना घडली. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा ही तिच्या आई-वडील आणि भावासह राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. यावेळी अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्याने गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले. (Vasai Crime)


याप्रकारानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर येताच अंजलीचा अपघात नाही तर हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अंजलीच्या भावाची चौकशी केली असता त्याने अंजलीसोबत झालेल्या एका किरकोळ वादाच्या रागात तिच्या डोक्यात थेट पक्कड घातली आणि तिचा खून झाला, असे समोर आले.

Comments
Add Comment

Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९

चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईला मोठा फटका, सूर्यकुमार पुन्हा अपयशी

चेन्नई : आयपीएल २०२६ मधील ४४ वा साखळी सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवर

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

उत्तर प्रदेश : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका मातेनेच पोटच्या चार मुलांची

Nashik: आईसोबतचा वाद टोकाला, ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी (panchavti) परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या

CSK VS MI : घरच्या मैदानावरील पराभावाचा बदला घेण्याची मुंबईला संधी, MI आणि CSK साठी 'करो-या-मरो'चा सामना

IPL 2026 CSK VS MI : आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार २ मे) चेन्नई आणि मुंबई यांचा आमना-सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा

Spirit Airlines : स्पिरिट एअरलाईन्स ३४ वर्षांनंतर बंद, सर्व उड्डाणे रद्द ; १७ हजार नोकऱ्यांवर संकट

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकट आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी