Delhi Building Collapsed : नागरिक गाढ झोपेत असतानाच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत!

४ जणांचा मृत्यू; १० जण अडकल्याची शक्यता


नवी दिल्ली : नवी दिल्लीतील (New Delhi) मुस्तफाबाद परिसरात मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Delhi Building Collapsed) घडली. तसेच दहाहून अधिकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (Delhi NDRF) टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र नागरिक गाढ झोपेत असतानाच पत्त्याच्या बंगल्यासारखी इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये ही घटना घडली. रात्री २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दलाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य दरम्यान, बाहेर काढण्यात आलेल्या १० जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला. बचावकार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्यात अजूनही ८ ते १० लोक अडकले असण्याची शक्यता आहे.


दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली असलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली त्या ठिकाणी दोन पुरुष आणि महिला राहतात. मोठ्या महिलेला तीन मुले आहेत, दुसऱ्या महिलेलाही तीन मुले आहेत. आम्हाला सध्या काहीही माहिती नाही. ते कुठेही दिसत नाहीत. (Delhi Building Collapsed)



इमारत कोसळण्याचे कारण काय?


शुक्रवारी दिल्लीतील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे शहराच्या अनेक भागांवर परिणाम झाला. त्यामुळेही इमारत कोसळल्याची शक्यता आहे. तसेच मागील आठवड्याच्या सुरुवातीला देखील दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत पडल्याची घटना घडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले होते.
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच