Kesari 2 Review : अक्की इज बॅक! अक्षय कुमारचा ‘केसरी २’ चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट आज (१८ एप्रिलला) जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने प्रसिद्ध वकील शंकरन नायरची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. करण सिंह त्यागी दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित, या चित्रपटात आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.


‘केसरी चॅप्टर २’ १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडे दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेमका कसा आहे, त्याबद्दल प्रेक्षकांनी पोस्ट केल्या आहेत. ‘केसरी चॅप्टर २’ पाहिल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू केले आहेत.



Kesari Chapter २ हा फक्त एक चित्रपट नाही, तर आपण काय गमावलं आणि आपण काय विसरता कामा नये, याची आठवण करून देणारा सिनेमा आहे, असं समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिलंय. त्यांनी या चित्रपटाला ४ स्टार रेटिंग दिले आहे.




अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला आहे, माधवनने अप्रतिम काम केलंय आणि करण सिंह त्यागीचे दिग्दर्शन कमाल आहे. त्याग आणि प्रतिकाराची एक उत्तम कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, असं एका युजरने चित्रपट पाहून लिहिलं आहे.




‘केसरी चॅप्टर २ उत्तम चित्रपट आहे. आर माधवन, अक्षय कुमार, अनन्या पांडे यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. देशभक्तीने ओतप्रोत कोर्टरूम ड्रामा. हा चित्रपट नक्की पाहा,’ असं एका युजरने म्हटलं आहे.

Comments
Add Comment

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या

अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच मोठ्या पडद्यावर! नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार नवा चित्रपट

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम

मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी होणार विभक्त? सोशल मीडीयावरील सोबतचे फोटो केले डिलीट

मुंबई: 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता आणि समीर चौगुले यांनी एक

मल्टिप्लेक्स तिकिटदर १०० ते १५० रुपये ठेवण्याची मागणी ; मंत्रालयात चित्रपट संघटनेची बैठक

मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकिट दर

कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात

मालवणी भाषेला कलेचे रुप देणारे 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड!

मुंबई: मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवाणकर यांन४ वयाच्या ८६व्या