MI vs SRH, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रोमांचक मुकाबला होईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): मागच्या सामन्यात मुंबई इंडियंन्सने दिल्ली कॅपीटल्सवर शेवटच्या षटकात ३ धावचीत करुन विजय मिळवला व सनरायजर्स हैदराबादने पंजाब किग्जवर सहज विजय मिळवला. दोन्ही संघ आता पर्यंत ६ सामने खेळलेत त्या पैकी चार सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहेतच परंतु २०-२० मध्ये ज्याची फलंदाजी किंवा गोलंदाजी उत्कृष्ट झाली त्यांचा तो दिवस.


गेल्या सामन्यात सामन्यात सनरायजर्सकडून अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची जबरदस्त खेळी करुन विजय खेचून आणला व मुंबईच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ बळी घेवून मुंबईचा पराभवाचा वनवास संपवला. आजचा सामना वानखेडे स्टेडीयम वर होत जो धावांसाठी अनुकुल आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक असे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांमुळे क्रिकेट रसीकांना आज एक रोमांचकारी सामना पाहवयास मिळेल. आतापर्यंत मुंबई इंडियंन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्या मध्ये २३ सामने झाले आहेत त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले व हैदराबादने १० सामने जिंकले.


आजच्या सामन्यांत दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, परंतु जो संघ नाणेफेक जिंकेल तोच विजयाचा दावेदार ठरेल. आजच्या सामन्यात अभिषेक विरुद्ध बुमराह हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इशान किशन आज मुंबई विरुद्ध खेळू शकतो गेले चारही सामने तो लवकर बाद झाला आहे. मागील सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियंन्सचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यांचीही फलंदाजी उत्तम आहे तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, नमन धीर, हार्दिक पांड्या असे फलंदाज आहेत.


रोहीत शर्माला अजून सूर गवसलेला नाही. आजच्या सामन्यात रोहीतला सूर गवसेल अशी वाट पाहत आहेत. तसेच मुंबई इंडियंन्सची गोलंदाजीही चांगली आहे. जसप्रित बुमराह आल्यामुळे त्यांचीही गोलंदाजीची ताकद वाढली आहे. जोडिला टेंट बोल्ट, मिचेल सँटनर, दिपक चहर, कर्ण शर्मा असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. एकूणच एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात शंका नाही. शेवटी जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे