MI vs SRH, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रोमांचक मुकाबला होईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): मागच्या सामन्यात मुंबई इंडियंन्सने दिल्ली कॅपीटल्सवर शेवटच्या षटकात ३ धावचीत करुन विजय मिळवला व सनरायजर्स हैदराबादने पंजाब किग्जवर सहज विजय मिळवला. दोन्ही संघ आता पर्यंत ६ सामने खेळलेत त्या पैकी चार सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहेतच परंतु २०-२० मध्ये ज्याची फलंदाजी किंवा गोलंदाजी उत्कृष्ट झाली त्यांचा तो दिवस.


गेल्या सामन्यात सामन्यात सनरायजर्सकडून अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची जबरदस्त खेळी करुन विजय खेचून आणला व मुंबईच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ बळी घेवून मुंबईचा पराभवाचा वनवास संपवला. आजचा सामना वानखेडे स्टेडीयम वर होत जो धावांसाठी अनुकुल आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक असे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांमुळे क्रिकेट रसीकांना आज एक रोमांचकारी सामना पाहवयास मिळेल. आतापर्यंत मुंबई इंडियंन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्या मध्ये २३ सामने झाले आहेत त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले व हैदराबादने १० सामने जिंकले.


आजच्या सामन्यांत दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, परंतु जो संघ नाणेफेक जिंकेल तोच विजयाचा दावेदार ठरेल. आजच्या सामन्यात अभिषेक विरुद्ध बुमराह हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इशान किशन आज मुंबई विरुद्ध खेळू शकतो गेले चारही सामने तो लवकर बाद झाला आहे. मागील सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियंन्सचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यांचीही फलंदाजी उत्तम आहे तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, नमन धीर, हार्दिक पांड्या असे फलंदाज आहेत.


रोहीत शर्माला अजून सूर गवसलेला नाही. आजच्या सामन्यात रोहीतला सूर गवसेल अशी वाट पाहत आहेत. तसेच मुंबई इंडियंन्सची गोलंदाजीही चांगली आहे. जसप्रित बुमराह आल्यामुळे त्यांचीही गोलंदाजीची ताकद वाढली आहे. जोडिला टेंट बोल्ट, मिचेल सँटनर, दिपक चहर, कर्ण शर्मा असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. एकूणच एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात शंका नाही. शेवटी जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए