MI vs SRH, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रोमांचक मुकाबला होईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): मागच्या सामन्यात मुंबई इंडियंन्सने दिल्ली कॅपीटल्सवर शेवटच्या षटकात ३ धावचीत करुन विजय मिळवला व सनरायजर्स हैदराबादने पंजाब किग्जवर सहज विजय मिळवला. दोन्ही संघ आता पर्यंत ६ सामने खेळलेत त्या पैकी चार सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहेतच परंतु २०-२० मध्ये ज्याची फलंदाजी किंवा गोलंदाजी उत्कृष्ट झाली त्यांचा तो दिवस.


गेल्या सामन्यात सामन्यात सनरायजर्सकडून अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची जबरदस्त खेळी करुन विजय खेचून आणला व मुंबईच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ बळी घेवून मुंबईचा पराभवाचा वनवास संपवला. आजचा सामना वानखेडे स्टेडीयम वर होत जो धावांसाठी अनुकुल आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक असे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांमुळे क्रिकेट रसीकांना आज एक रोमांचकारी सामना पाहवयास मिळेल. आतापर्यंत मुंबई इंडियंन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्या मध्ये २३ सामने झाले आहेत त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले व हैदराबादने १० सामने जिंकले.


आजच्या सामन्यांत दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, परंतु जो संघ नाणेफेक जिंकेल तोच विजयाचा दावेदार ठरेल. आजच्या सामन्यात अभिषेक विरुद्ध बुमराह हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इशान किशन आज मुंबई विरुद्ध खेळू शकतो गेले चारही सामने तो लवकर बाद झाला आहे. मागील सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियंन्सचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यांचीही फलंदाजी उत्तम आहे तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, नमन धीर, हार्दिक पांड्या असे फलंदाज आहेत.


रोहीत शर्माला अजून सूर गवसलेला नाही. आजच्या सामन्यात रोहीतला सूर गवसेल अशी वाट पाहत आहेत. तसेच मुंबई इंडियंन्सची गोलंदाजीही चांगली आहे. जसप्रित बुमराह आल्यामुळे त्यांचीही गोलंदाजीची ताकद वाढली आहे. जोडिला टेंट बोल्ट, मिचेल सँटनर, दिपक चहर, कर्ण शर्मा असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. एकूणच एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात शंका नाही. शेवटी जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी