MI vs SRH, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रोमांचक मुकाबला होईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): मागच्या सामन्यात मुंबई इंडियंन्सने दिल्ली कॅपीटल्सवर शेवटच्या षटकात ३ धावचीत करुन विजय मिळवला व सनरायजर्स हैदराबादने पंजाब किग्जवर सहज विजय मिळवला. दोन्ही संघ आता पर्यंत ६ सामने खेळलेत त्या पैकी चार सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहेतच परंतु २०-२० मध्ये ज्याची फलंदाजी किंवा गोलंदाजी उत्कृष्ट झाली त्यांचा तो दिवस.


गेल्या सामन्यात सामन्यात सनरायजर्सकडून अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची जबरदस्त खेळी करुन विजय खेचून आणला व मुंबईच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ बळी घेवून मुंबईचा पराभवाचा वनवास संपवला. आजचा सामना वानखेडे स्टेडीयम वर होत जो धावांसाठी अनुकुल आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक असे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांमुळे क्रिकेट रसीकांना आज एक रोमांचकारी सामना पाहवयास मिळेल. आतापर्यंत मुंबई इंडियंन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्या मध्ये २३ सामने झाले आहेत त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले व हैदराबादने १० सामने जिंकले.


आजच्या सामन्यांत दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, परंतु जो संघ नाणेफेक जिंकेल तोच विजयाचा दावेदार ठरेल. आजच्या सामन्यात अभिषेक विरुद्ध बुमराह हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इशान किशन आज मुंबई विरुद्ध खेळू शकतो गेले चारही सामने तो लवकर बाद झाला आहे. मागील सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियंन्सचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यांचीही फलंदाजी उत्तम आहे तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, नमन धीर, हार्दिक पांड्या असे फलंदाज आहेत.


रोहीत शर्माला अजून सूर गवसलेला नाही. आजच्या सामन्यात रोहीतला सूर गवसेल अशी वाट पाहत आहेत. तसेच मुंबई इंडियंन्सची गोलंदाजीही चांगली आहे. जसप्रित बुमराह आल्यामुळे त्यांचीही गोलंदाजीची ताकद वाढली आहे. जोडिला टेंट बोल्ट, मिचेल सँटनर, दिपक चहर, कर्ण शर्मा असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. एकूणच एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात शंका नाही. शेवटी जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात