Buldhana Water Shortage : बुलढाण्यात पाणीबाणी! दोन आठवड्यानंतर होतोय पाणीपुरवठा

पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता


बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा (Summer heat) चांगलाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून उन्हाच्या झळांचा (Heat Wave) नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. मात्र अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. (Water Shortage)



मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात ५०० हून अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.



राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक


महाराष्ट्रासमोर पाणीसंकट (Water crisis) उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.



उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता 


पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) सध्या तीन टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Water Shortage)


तवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६६ पूर्णांक ६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Comments
Add Comment

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला