Buldhana Water Shortage : बुलढाण्यात पाणीबाणी! दोन आठवड्यानंतर होतोय पाणीपुरवठा

Share

पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता

बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा (Summer heat) चांगलाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून उन्हाच्या झळांचा (Heat Wave) नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. मात्र अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. (Water Shortage)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात ५०० हून अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक

महाराष्ट्रासमोर पाणीसंकट (Water crisis) उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.

उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) सध्या तीन टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Water Shortage)

तवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६६ पूर्णांक ६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago