

मुंबई : भारतीय रेल्वे ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. आज वंदे भारत, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस अशा ...

मुंबई : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत ...

मुंबई : ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात ...

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर ऑन-बोर्ड एटीएम सेवा लोकप्रिय झाली तर ती इतर प्रमुख गाड्यांमध्येही वाढवता येईल. याचा अर्थ असा की जर लोकांना हे एटीएम आवडले तर ते अधिक गाड्यांमध्ये बसवले जाईल. यामुळे प्रवाशांना मोठी सोय होईल. आता त्यांना पैसे काढण्यासाठी स्टेशनवर उतरण्याची गरज भासणार नाही. ते ट्रेनमध्येच आरामात पैसे काढू शकतील. रेल्वेचा अभिनव प्रयोग सध्या गाडी क्रमांक १२११० मनमाड–मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटीदरम्यान धावते. एकूण २२ डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता दोन हजार ३२ असून दररोज सुमारे २२०० प्रवासी मुंबई सीएसएमटीकडे प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे. या सेवेसाठी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेवर किंवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण एटीएम कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत बसवण्यात येत आहे. ही संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवली जात आहे. ही ऑनबोर्ड एटीएम सेवा प्रत्यक्षात अंमलात आल्यावर, प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार आहेत—विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होतील. भारतीय रेल्वेच्या प्रवासी अनुभवात सातत्याने सुधारणा आणि पारंपरिक महसूल पद्धतींपलीकडे जाऊन नवकल्पना राबवण्याच्या वचनबद्धतेचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भुसावळ विभागाला या उपक्रमाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान असून लवकरच इतर महत्वाच्या गाड्यांमध्येही ही सुविधा देण्याच्या शक्यतेचा विचार केला जात आहे, जेणेकरून रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि प्रवाशीहितकारी होईल.