मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची एमएमआरडीएच्या सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर आर एस चव्हाण यांची बदली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून वरिष्ठ पातळीवरील प्रशासनात खांदेपालट सुरू झाला. त्यामध्ये आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आधी १ एप्रिल रोजी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाडीसकॉमचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, हिंगोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर सत्यम गांधी यांची सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांची डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आस्तिक कुमार पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहेत. इतिहास विषयात एमए पदवी मिळवण्याबरोबरच त्यांनी टेक्नोलॉजी मिडीवल इंडिया या विषयामध्ये पीएचडीही केली आहे. त्यांनी यूजीसी/जेआरएफ आणि एनईटी देखील उत्तीर्ण केले आहे. त्याने यूपीएससी सीएसई २०१० मध्ये पांडे यांनी ७४ वा क्रमांक मिळवला. ते २०११च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अस्तिक कुमार पांडे यांना झारखंड केडर देण्यात आले होते. मात्र आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर अस्तिक कुमार पांडे महाराष्ट्रात आले.
यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत…
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…