पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पर्यावरणाला धोका

  52

ढिगाऱ्यांचा चुकीचा साठा सावित्री व चोळई नदीपात्राला धोकादायक!


पोलादपूर : महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू झाले असले तरी या कामामुळे पोलादपूर परिसरातील सावित्री व चोळई नद्यांना पर्यावरणीय धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डोंगर उतार व साईडपट्ट्यांची माती उकरून थेट सावित्री नदीच्या काठावर टाकली जात असून, आगामी पावसाळ्यात या मातीचा चिखल नदीपात्रात पसरून प्रदूषण वाढू शकते.







डोंगर खणून नदीकाठी भराव – पर्यावरणाचा विसर?


रस्त्याच्या रुंदीकरणासाठी साईडपट्ट्या व डोंगर उतारावरील माती सावित्री नदीच्या पोलादपूर नगरपंचायतीच्या जॅकवेलजवळील गॅबियन स्ट्रक्चरलगत टाकली जात आहे. त्याचबरोबर चोळई नदीच्या काठावरही ढिगारे उभे करण्यात आले आहेत. हे काम रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सुमारे २४.२०० किमी रस्त्यावर सुरू असून, रानबाजिरे, कापडे बुद्रुक, आड, कुंभळवणे यासारख्या गावांचा समावेश आहे.







हरित लवादाचा दंडही उपयोगी पडला नाही


सावित्री नदीतील प्रदूषणाच्या कारणावरून २०२१ मध्ये हरित लवादाने नगरपंचायतीवर ७ लाखांचा दंड ठोठावला होता. तरीही सावध न होता नगरपंचायतीने शहरातील घन व द्रव कचरा नदीपात्रात डंप करण्यास सुरुवात केली होती. त्यात आता रुंदीकरणाच्या मातीचा भराव देखील पर्यावरणीय संकटात भर टाकतो आहे.







नागरिकांमध्ये चिंता – प्रशासनाकडे अपेक्षा


पोलादपूर शहरालगतच्या या कामामुळे नदी प्रदूषणाचे संकट वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पोलादपूर तहसिलदारांनी हस्तक्षेप करून मातीच्या ढिगाऱ्यांचा योग्य साठवणूक करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा सावित्री नदीची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.







घाटरस्ता पुन्हा एकदा चर्चेत


२१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या सातारा बाजूने कामाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील भागातही काम प्रगतीपथावर सुरू आहे.






पण हे सगळे वास्तव चित्र पाहता, एकीकडे विकासकामे सुरू असतानाच दुसरीकडे नद्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. पावसाळ्यापूर्वीच योग्य नियोजन न झाल्यास पर्यावरणीय संकट उंबरठ्यावर उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास ही महागला..! ओला, उबेर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ

मुंबई: सध्या महागाई इतकी वाढत चालली आहे की, त्याचा फटका मध्यमवर्गीयांना पडत आहे. बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

Insurance Awareness Committee Update: ‘सबसे पहले लाईफ इन्शुरन्स’ मोहिमेद्वारे विमा जागरूकता समिती संरक्षण-प्रथम आर्थिक नियोजनाला चालना

मुंबई: भारताला जीवन विमा संरक्षणातील एका महत्त्वपूर्ण तफावतीचा सामना करावा लागत आहे जो २०१९ मध्ये ८३% वरून २०२३

लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन

माद्रिद: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या