Bhushan Gavai : नागपूरचे भूषण गवई होणार सरन्यायाधीश

नागपूर : सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. नागपूरचे भूषण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहे. ते मूळचे नागपूरकर आहेत. भूषण गवई हे विद्यमान सरन्यायाधीशांच्या नंतरचे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या दिवशीच भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. या निमित्ताने न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य सरन्यायाधीश होणार आहे.



संजीव खन्ना यांच्या आधी सरन्यायाधीश पद भूषवणारे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुद्धा महाराष्ट्राचेच होते.

कारकिर्द

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला.

वकिलीला सुरुवात १६ मार्च १९८५ रोजी केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि माजी न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत १९८७ पर्यंत काम केले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९८७ ते १९९० या काळात स्वतंत्रपणे वकिली केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १९९० जास्त वकिली केली.

न्यायमूर्ती भूषण गवई हे नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.

भूषण गवई ऑगस्ट १९९२ ते १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती.

नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून १७ जानेवारी २००० मध्ये भूषण गवई यांची नियुक्ती

उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची १४ नोव्हेंबर २००३ मध्ये बढती

भूषण गवई यांची १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची २४ मे २०१९ रोजी नियुक्ती
Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या