दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या २९व्या सामन्यात अखेर मुंबईला विजयी सूर गवसला आहे. सलग ४ सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर दिल्लीविरुद्ध दिल्लीच्याच मैदानात विजय मिळवण्यास मुंबईला यश मिळाले आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईने दिल्लीला १२ धावांनी हरवत आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आहे.
तिलक वर्माच्या धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. तिलक वर्माने जबरदस्त खेळ करताना ३३ बॉलमध्ये ५९ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
त्याआधी सलामीसाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा अयशस्वी ठरला. त्याने १८ धावा केल्या. रियान रिकल्टनने २५ बॉलमध्ये ४१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने यादवने फटकेबाजी करताना २८ बॉलमध्ये ४० धावा तडकावल्या. नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर विल जॅक्स आणि नमन धीर यांनी धावून ४ धावा काढल्या. दिल्लीकडून विप्रज निगम आणि कुलदीप यादवने २ धावा ठोकल्या.
मुंबईने दिलेले हे आव्हान खरंतर दिल्लीसाठी मोठे नव्हते. दिल्लीच्या करूण नायरने ४० बॉलमध्ये ८९ धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे विकेट पटापट गेले आणि दिल्लीचा पराभव झाला. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे ३ विकेट झटपट पडले.