Summer Skin : उन्हाळ्यात टॅनिंग असं करा दूर!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून त्वचेचं संरक्षण कसं करावं ही एक मोठी चिंता असते. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासह त्वचेची सुद्धा विशेष काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते, ज्यामुळे मुरुमे, सनबर्न आणि पुरळ यांसारख्या समस्या वाढू शकतात. मात्र असं सगळं जरी असलं तरी त्वचेची योग्य काळजी घेतली गेली तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे अनेकवेळा टॅनिंगच्या समस्या उद्भवतात. टॅनिंगमुळे तुमची त्वचा काळपट होते. उन्हाळा येताच, सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे त्वचा काळी आणि टॅन होते. उन्हात बाहेर पडायचं म्हणजे चेहरा झाकणं, गॉगल्स घालायचे आणि सूर्यापासून रक्षण करायचं असे सर्वत्र प्रयत्न सुरू होतात. मात्र तरीही यामुळे त्वचा पूर्णपणे सुरक्षित नसते. अनेकजण शरीरावरील टॅनिंग दूर करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. पण जास्त घाबरू नका, तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी येथे काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत.



चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढणं गरजेचं


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा अधिक तेलकट होऊ लागतो. नॉर्मल त्वचा असलेल्यांची त्वचा देखील या दिवसांमध्ये तेलकट होऊ लागते अशा वेळी ऑईली स्किन असलेल्यांसाठी तर खूप मोठी अडचण निर्माण होते. यासाठीच उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी योग्य फेसवॉश निवडणं गरजेचं आहे.



चेहरा ४-५ वेळा धुणे


दिवसातून चेहरा ४-५ वेळा धुणे गरजेचं आहे जेणेकरून त्वचा उजळण्यास मदत होईल.



त्वचा हायड्रेट ठेवणं गरजेचं 


त्वचेला स्वच्छ ठेवण्यासोबतच ती हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी, दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्या आणि नारळपाणी, ताक आणि फळांनी भरलेले डिटॉक्स वॉटर देखील प्या, जेणेकरून शरीर आतून हायड्रेट राहील. तसंच काही फळांचा फेस पॅकलावूनही त्वचा हायड्रेट राहू शकते.



मृत त्वचा काढणं गरजेचं


त्वचा तेलकट होत असल्याने या काळात त्वचेवर घाण, घाम, तेल आणि धूळ तयार होते. ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि मुरुमांची समस्या वाढू शकते. यासाठी वेळोवेळी चेहरा स्क्रब करणं गरजेचं आहे. डेड सेल्स काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती एक्सफोलिएटचा वापर करू शकता.



सनस्क्रिनचा वापर


उन्हाळ्यासाठी सनस्क्रिन हा अतिआवश्यक आहे. यामुळे सूर्याच्या यूव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. तुमच्या त्वचेप्रमाणे सनस्क्रीन निवडणं गरजेचं आहे. तसंच सनस्क्रीन हे किमान ३० SPF क्षमता असलेलं तरी असावं. घरातून बाहेर निघण्यापूर्वी किमान २० मिनिट आधी ते लावावं. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात बाहेर राहणार असाल. तर अशावेळी सतत घाम येऊ शकतो. त्यामुळे शक्य झाल्यास काही तासांनी पुन्हा चेहरा धुवून सनस्क्रिन लावल्यास जास्त फायदा होईल.



टोनिंग


टोनर त्वचेच्या पीएचचे संतुलन राखण्यास मदत करते. उन्हाळ्यात, गुलाबपाणी, काकडीचा रस किंवा कोरफडीचा रस असलेले टोनर वापरा, जे त्वचेला हायड्रेट ठेवू शकतात.



मॉइश्चरायझिंग


उन्हाळ्यातही त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्त्वाचे आहे. पाण्यावर आधारित, जेल-आधारित किंवा हायल्यूरॉनिक अॅसिड असलेले हलके मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला चिकट न बनवता खोलवर पोषण देतील.



फळांचं सेवन करा


तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिझनल फळं आणि भाज्यांच्या समावेश करणं फार गरजेचं आहे. त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण मिळणं देखील तितकचं गरजेचं आहे. यासाठी फळं आणि भाज्या हा चांगला पर्याय आहे.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात