MI vs RCB, IPL 2025: मुंबई शेवटपर्यंत लढली, मात्र वानखेडेच्या मैदानावर हरली, आरसीबीचा १२ धावांनी विजय

मुंबई: वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात चांगलाच रंगतदार सामना झाला. मुंबईच्या शेवटच्या बॉलपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईला जिंकण्यासाठी २२२ धावा हव्या होत्या. मात्र त्यांना २० षटकांत २०९ धावाच करता आल्या.


मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तिलक वर्माने २९ बॉलमध्ये ५६ धावा ठोकल्या. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ४२ धावांची खेळी केली.


या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २२१ धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदारने शानदार अर्धशतक ठोकले.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आरसीबाला पहिल्याच षटकात धक्का बसला. फिल सॉल्ट दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. मात्र यानंतर आरसीबीचा संघ सावरला. विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. देवदत्त पड्डिकलही लयीमध्ये दिसला. पड्डिकल ९व्या षटकांत ३७ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. मात्र १५व्या षटकांत हार्दिक पांड्याने कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी दोघांना बाद केले. विराट कोहलीने ४२ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. मात्र यानंतर रजत पाटीदारने कमालीची फलंदाजी केली. पाटीदारने ३२ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. याच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट गमावत मुंबईसमोर २२२ धावांचे आव्हान दिले होते.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.