MI vs RCB, IPL 2025: मुंबई शेवटपर्यंत लढली, मात्र वानखेडेच्या मैदानावर हरली, आरसीबीचा १२ धावांनी विजय

मुंबई: वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात चांगलाच रंगतदार सामना झाला. मुंबईच्या शेवटच्या बॉलपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईला जिंकण्यासाठी २२२ धावा हव्या होत्या. मात्र त्यांना २० षटकांत २०९ धावाच करता आल्या.


मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तिलक वर्माने २९ बॉलमध्ये ५६ धावा ठोकल्या. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ४२ धावांची खेळी केली.


या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २२१ धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदारने शानदार अर्धशतक ठोकले.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आरसीबाला पहिल्याच षटकात धक्का बसला. फिल सॉल्ट दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. मात्र यानंतर आरसीबीचा संघ सावरला. विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. देवदत्त पड्डिकलही लयीमध्ये दिसला. पड्डिकल ९व्या षटकांत ३७ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. मात्र १५व्या षटकांत हार्दिक पांड्याने कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी दोघांना बाद केले. विराट कोहलीने ४२ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. मात्र यानंतर रजत पाटीदारने कमालीची फलंदाजी केली. पाटीदारने ३२ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. याच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट गमावत मुंबईसमोर २२२ धावांचे आव्हान दिले होते.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी