MI vs RCB, IPL 2025: मुंबई शेवटपर्यंत लढली, मात्र वानखेडेच्या मैदानावर हरली, आरसीबीचा १२ धावांनी विजय

  82

मुंबई: वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात चांगलाच रंगतदार सामना झाला. मुंबईच्या शेवटच्या बॉलपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईला जिंकण्यासाठी २२२ धावा हव्या होत्या. मात्र त्यांना २० षटकांत २०९ धावाच करता आल्या.


मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तिलक वर्माने २९ बॉलमध्ये ५६ धावा ठोकल्या. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ४२ धावांची खेळी केली.


या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २२१ धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदारने शानदार अर्धशतक ठोकले.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आरसीबाला पहिल्याच षटकात धक्का बसला. फिल सॉल्ट दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. मात्र यानंतर आरसीबीचा संघ सावरला. विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. देवदत्त पड्डिकलही लयीमध्ये दिसला. पड्डिकल ९व्या षटकांत ३७ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. मात्र १५व्या षटकांत हार्दिक पांड्याने कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी दोघांना बाद केले. विराट कोहलीने ४२ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. मात्र यानंतर रजत पाटीदारने कमालीची फलंदाजी केली. पाटीदारने ३२ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. याच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट गमावत मुंबईसमोर २२२ धावांचे आव्हान दिले होते.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट