माझं काय चुकलं ?

  29

आमच्या गावचा बबलू
आळशीच आहे फार
शब्दाला मात्र सदानकदा
लावीत बसतो धार

शाळेत एकदा तो
खूपच उशिरा आला
सरांनी विचारले त्याला,
‘का रे उशीर झाला?’

बबलू म्हणाला, ‘गुरुजी,
आज आळसच लय आला
म्हणूनच शाळेत यायला
उशीर मला हो झाला...!’

गुरुजी म्हणाले, ‘अरे आपण
आळसाला शत्रू मानतो
प्रगतीच्या मार्गात आपल्या
अडथळा तो आणतो’

बबलू लगेच म्हणाला,
‘गुरुजी, माझं काय चुकलं?
शत्रूवरती प्रेम करा,
तुम्हीच आम्हास सांगितलं.’

गुरुजींना कळून चुकले
बबलू बोलण्यात तरबेज
फार सोयीचा अर्थ काढून
करी समोरच्याला गपगार !

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) नाजूक हिरवी
कोवळी किती
लहानशा झुळकीनेही
कमरेत वाकती

जमिनीवर हिरवीगार
जणू शाल अंथरते
जनावरांचे लुसलुशीत
अन्न कोण होते?

२) श्री लिहून काहीजण
करतात सुरुवात
घरचा पत्ता लिहितात
उजव्या कोपऱ्यात

मायना लिहून
नमस्कार करतात
शेवटी ता.क. लिहून
गोडी कोण वाढवतात?

३) झाड होऊन
शितल छाया धरतो
झरा होऊन
खळखळून हसतो

नदी होऊन
पुढे जाण्यास सांगतो
देण्यातला आनंद कोण
लुटण्यास शिकवतो?

उत्तर -


१) गवत
२) पत्र
३) निसर्ग
Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या