माझं काय चुकलं ?

आमच्या गावचा बबलू
आळशीच आहे फार
शब्दाला मात्र सदानकदा
लावीत बसतो धार

शाळेत एकदा तो
खूपच उशिरा आला
सरांनी विचारले त्याला,
‘का रे उशीर झाला?’

बबलू म्हणाला, ‘गुरुजी,
आज आळसच लय आला
म्हणूनच शाळेत यायला
उशीर मला हो झाला...!’

गुरुजी म्हणाले, ‘अरे आपण
आळसाला शत्रू मानतो
प्रगतीच्या मार्गात आपल्या
अडथळा तो आणतो’

बबलू लगेच म्हणाला,
‘गुरुजी, माझं काय चुकलं?
शत्रूवरती प्रेम करा,
तुम्हीच आम्हास सांगितलं.’

गुरुजींना कळून चुकले
बबलू बोलण्यात तरबेज
फार सोयीचा अर्थ काढून
करी समोरच्याला गपगार !

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) नाजूक हिरवी
कोवळी किती
लहानशा झुळकीनेही
कमरेत वाकती

जमिनीवर हिरवीगार
जणू शाल अंथरते
जनावरांचे लुसलुशीत
अन्न कोण होते?

२) श्री लिहून काहीजण
करतात सुरुवात
घरचा पत्ता लिहितात
उजव्या कोपऱ्यात

मायना लिहून
नमस्कार करतात
शेवटी ता.क. लिहून
गोडी कोण वाढवतात?

३) झाड होऊन
शितल छाया धरतो
झरा होऊन
खळखळून हसतो

नदी होऊन
पुढे जाण्यास सांगतो
देण्यातला आनंद कोण
लुटण्यास शिकवतो?

उत्तर -


१) गवत
२) पत्र
३) निसर्ग
Comments
Add Comment

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा

२०२५ वर्षात काय कमावले, काय गमावले

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात प्रत्येक वर्ष हे अनुभवांचे दालन उघडते. २०२५ हे वर्षही तसेच

भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या

सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात