Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन


मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची (Mumbai News) बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी मुंबईतील काही भागात जलवाहिन्यांच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून प्या, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)



मिळालेल्या माहितीनुसार,एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जुनी झाली आहे. या कारणाने जुनी जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे - कुर्ला संकूल परिसरामध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.


या जलवाहिनी विषयक कामकाज झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Water Supply)

Comments
Add Comment

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व