Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCrime : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक

Crime : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक

मुंबई : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक करण्यात आली. ही कारवाई दक्षता विभागाच्या निरीक्षकांच्या निर्देशांनंतर केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाल्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याप्रमाणे हुबेहूब असे बनावट सही शिक्के तयार करुन घेतले आणि त्यांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.

Mumbai Railway Megablock : जाणून घ्या रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लॉकची वेळ

रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन घेण्यासाठी चहावाला प्रवाशांना मोठी रक्कम आकारत होता. स्वतःकडे असलेल्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन तो तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत होता. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. यासाठी चहावाल्या रवींद्र कुमार साहूने विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले होते.

Gokul Milk : मुंबईत गोकुळ दूध विक्रीत ६० हजार लिटरने घट!

साहूने बनावट सही शिक्के वापरुन रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत दरमहा दीड ते दोन लाख रुपयांची कमाई सुरू केली होती. मागील काही महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. रेल्वे कोट्याचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर दक्षता विभागाने तपास सुरू केला. मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांचे पथक कोलकाता मेलमधील तिकीटधारकांची तपासणी करत होते. यावेळी काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतल्याचे सांगितले. दक्षता अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करत चौकशी सुरू केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाला रवींद्र कुमार साहू हा व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले.

बोरिवली, राम मंदिर पश्चिम रेल्वेचा रात्रीचा ब्लॉक

साहूने मागील तीन महिन्यांपासून दररोज पाच ते सहा तिकिटे व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन दिल्याची कबुली दिली आहे. पण मागील किमान दोन वर्षांपासून व्हीआयपी कोट्याच गैरवापर सुरू असल्याचा संशय रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणी साहूची चौकशी सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -