सिंधुदुर्ग ते पुणे आठवड्याचे ५ दिवस विमानसेवा सुरु

पणजी: सिंधुदुर्ग ते पुणे थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गोव्यातील फ्लाय - ९१ या कंपनीने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (०१ एप्रिल) पासून ही विमानसेवा सुरु केली आहे. आठवड्याचे पाच दिवस ही विमानसेवा सुरु असेल.

फ्लाय - ९१ कंपनीने मंगळवारी (०१ एप्रिल) पासून सिंधुदुर्ग - पुणे - सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु करण्यात आली. पुण्यातून सकाळी ७.५० वाजता सुटलेले विमान सकाळी ९.१० वा सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.



सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते पुणे विमानतळ सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. फ्लाय - ९१ या कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावरुन फ्लाईट बुकिंगला सुरुवात केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. अखेर दोन महिन्यानंतर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग देखील विमानसेवा लवकरच सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग - पुणे विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला २,९४१ रुपये मोजावे लागतील. यात विविध कर वाढण्याची शक्यता आहे. नमूद करण्यात आलेला दर कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. गोव्यात येण्यासाठी फ्लाईट चुकल्यास अथवा विमानभाडे परवडत नसल्यास पर्यटकांना चिपी विमानतळावरुन गोव्यात येणे सोप्पं होणार आहे. शिवाय सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनासाठी आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य