मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) त्यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) मागितले, जे MCA ने मंजूर केले आहे.
या निर्णयामुळे २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ हंगामापासून गोव्याकडून खेळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी पुष्टी केली की जयस्वाल पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार आणि राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळा असताना तो संघाचे नेतृत्वही करू शकतो.
Naseem Shah: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
जयस्वालने अखेरचा सामना मुंबईकडून २३-२५ जानेवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी ग्रुप अ लीग फेरीच्या सामन्यात जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर जयस्वालने शेवटचा सामना खेळला होता.
त्या सामन्यात, जयस्वालने रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात एकमेव खेळ केला होता, त्याने ४ आणि २६ धावा केल्या होत्या या वेळी दुसऱ्यांदा मुंबईचा जम्मू आणि काश्मीरकडून पाच विकेट्सने पराभव झाला होता.
जयस्वालचा हा निर्णय मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो अलिकडच्या काळात गोव्यात स्थलांतरित होणारा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर तिसरा प्रमुख खेळाडू आहे.