अखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी

Share

पाच संस्थांनी दाखवले स्वारस्य, निविदा अंतिम टप्प्यात

मुंबई(खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपली चिकित्सा’ योजना अचानक बंद पडल्यानंतर यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून अखेर निविदा अटींमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेच्या या योजनेसाठी तीन पेक्षा जास्त कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये सध्या देवू केलेल्या ८६ रुपयांच्या चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित केला असून त्यानंतरच या योजनेसाठी विविध कंपन्या पुढे आल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. ही निवड चार वर्षांकरता होती. परंतु डिसेंबर २०२४ पासूनच या संस्थेने पुढे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु होती.

या निविदेमध्ये १४० चाचण्यांच्या तुलनेत नव्याने मागवलेल्या निविदेत ८० चाचण्या करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी मूलभूत चाचण्या या १०१ ऐवजी ५५ आणि प्रगत चाचण्यांसाठी ३९ ऐवजी ३५ असे प्रमाण केंले होते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटातील रकमेतील ८६ रुपये प्रति चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित करून यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये क्रस्ना डायग्नोस्टीकसह अन्य चार संस्थांनी भाग घेतला असून लवकरच यातील पात्र कंपन्यांची निवड करून त्यांच्या मार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जो कमी दर आकारणाऱ्या संस्थेची निवड केली जाईल असेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

19 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

34 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

43 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago