नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ विधेयक बुधवार २ एप्रिल रोजी सादर होणार आहे. हे विधेयक चर्चेअंती विना अडथळा मंजूर व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने लोकसभेतील पक्षाच्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. या व्हिपद्वारे भाजपाच्या लोकसभेतील सर्व खासदारांना बुधवार २ एप्रिल रोजी दिवसभर कामकाजासाठी हजर राहण्याचे तसेच मतदानावेळी पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
BJP issues whip to all Lok Sabha MPs to be present in Parliament tomorrow, 2nd April.
On 2nd April, Waqf Amendment Bill will be introduced for consideration and passing. pic.twitter.com/8coAnUDpyg
— ANI (@ANI) April 1, 2025
Liquor Ban : या तीर्थक्षेत्री १ एप्रिलपासून लागू झाली दारुबंदी
याआधी संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी वक्फ विधेयक लोकसभेत सादर केले होते. त्यावेळी विधेयक लोकसभेतून एकमताने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशी आणि सूचनांच्याआधारे वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत सादर होणार आहे.
Bajinder Singh : ‘येशू येशू प्रॉफेट’ बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?
भाजपाने व्हिप काढला आहे. रालोआतील इतर घटक पक्षांकडूनही व्हिप काढले जाण्याची शक्यता आहे. तेलगू देसम पक्षाने विधेयकाचे समर्थन करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेत सध्या ५४२ खासदार आहेत. यात भाजपाचे २४० खासदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए अर्थात रालोआचे एकूण खासदार २९३ आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी २७२ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे लोकसभेत रालोआची बाजू भक्कम दिसत आहे. लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार आहेत. इंडी आघाडीचे एकूण खासदार २३३ आहेत. या व्यतिरिक्त काही लहान पक्षांचे खासदार आणि निवडक अपक्ष खासदार आहेत. पण या मंडळींनी वक्फ विधेयकाला विरोध करणार की पाठिंबा देणार हे जाहीर केलेले नाही. ही आकडेवारी बघता लोकसभेत विरोधकांची बाजू कमकुवत आहे.
लोकसभेत मंजूर झाले तर वक्फ विधेयक लवकरच राज्यसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सध्या २३६ खासदार आहेत. यात भाजपाचे ९८ खासदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए अर्थात रालोआचे एकूण खासदार ११५ आहेत. सहा नामनिर्देशित खासदार सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता गृहित धरली तर विधेयकाला १२१ जणांचा पाठिंबा मिळेल. विधेयक मंजूर करण्यासाठी ११९ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे राज्यसभेतही रालोआची बाजू विरोधकांच्या तुलनेत वरचढ दिसत आहे. राज्यसभेमध्ये काँग्रेसचे २७ आणि इंडी आघाडीचे एकूण खासदार ५८ आहेत. या व्यतिरिक्त काही लहान पक्षांचे खासदार आणि निवडक अपक्ष खासदार आहेत. पण या मंडळींनी वक्फ विधेयकाला विरोध करणार की पाठिंबा देणार हे जाहीर केलेले नाही.यात वायएसआर काँग्रेसचे नऊ, बिजू जनता दलाचे सात, अण्णाद्रमुकचे चार तसेच इतर तीन खासदार आहेत.