Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीMaharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

पहा राज्यात कसं असेल तापमान?

मुंबई : चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची (Weather Update) वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

Healthy Life: दीर्घायुष्यासाठी ही ४ कामे जरूर करा

शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले (Meteorological Department) आहे.

ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट 

आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. (Mumbai Weather)

आज नाशकात ऑरेंज अलर्ट 

मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Nashik Weather)

पुण्यातही पावसाची शक्यता (Pune Weather)

पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

दरम्यान, बदलत्या हवामानमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -