Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट
अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या महिलेची सात-आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
महिलेचा मृतदेह आणि संशयास्पद हत्येचा तपास
गुरुवार (२७ मार्च २०२५) रोजी बीडमधील कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने वेगवेगळ्या “मनीषा आकुसकर”, “मनीषा बिडवे”, “मनीषा बियाणी” आणि “मनीषा गोंदवले” या नावांनी आपली ओळख बदलून विविध ठिकाणी वावर केला होता.
Maharashtra Breaking News : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपीना कारागृहात मारहाण
सदर महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात होती आणि संतोष देशमुख यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, अशी चर्चाही रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?
सदर महिलेला ठार मारण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे नष्ट करण्याचा डाव आहे की तिचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाला? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. बीड पोलिसांना ही माहिती उशिराने मिळाली आणि पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मृतदेह पूर्णतः सडलेला आढळला.
पोलिस तपास आणि पुढील कारवाई
बीड पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार उरकले असून, या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या घटनेने भय आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस तपासातूनच आता खरी माहिती समोर येईल, असे बोलले जात आहे.
अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2025
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची