Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.



प्रशांत कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेतले आणि २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २५ मार्च रोजी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा एकदा हजर केले असताना त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. या कोठडीची मुदत संपताच त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.



छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोणी आणि कशा स्वरुपात मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार