नवी दिल्ली: म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाने मोठा हाहाकार माजवला आहे. शनिवारीही भूकंपाचे झटके जाणवले. शनिवारी दुपारी भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. भारताने भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत मेडिकल टीम पाठवली आहे. म्यानारमध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६४४ वर पोहोचली आहे.
म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत सातत्याने बचावकार्य करत आहे. भारताने संवेदना प्रकट करताना शक्य होईल तितके मदतीचे आश्वासन दिले आहे. भारताने ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत स्पेशल मेडिकल टास्क फोर्स बचाव कार्यासाठी तैनात केले आहे.
लेफ्टनंट कर्नल जगनीत गिलच्या नेतृत्वात ११८ सदस्यीय मेडिकल टीम म्यानमारसाठी रवाना झाली आहे. ही टीम एअरबोर्न एंजल्स टास्क फोर्सचा भाग आहे.
शुक्रवारी चीन, म्यानमार, थायलंड आणि भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. म्यानमारमध्ये पहिला भूकंप १२.५० वाजता आला. याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदु म्यानमारच्या सागाईंग शहराच्या जवळ पृथ्वीच्या १० किमी खोल होता. युनायटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की १२ मिनिटांनंतर दुसरा भूकंप आला. याची तीव्रता ६.४ इतकी होती. या भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये जनजीवत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
नवी मुंबई : सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या की शासकीय कर्मचारी सहलीसाठी पळ काढतात अथवा गावी…
पुणे : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई - पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली…
मुंबई : देशभरात नावाजलेली व्हीआय (Vodafone Idea) या प्रमुख दूरसंचार कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने 5G सेवा…
अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या…
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आहे. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल…
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट आज (१८ एप्रिलला)…