Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये एका चकमकीत १६ नक्षलवादी ठार, भोपालपट्टनममध्ये तीन महिन्यांत ७८ नक्षलवादी ठार

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. मोहीम अद्याप सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.



सुरक्षा पथकाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार २९ मार्च २०२५ रोजी सकाळी चकमक सुरू झाली. ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात सुरू आहे. डीआरजी अर्थात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (जिल्हा राखीव जवान) आणि सीआरपीएफ अर्थात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (केंद्रीय राखीव पोलीस दल) यांनी संयुक्त कारवाई केली. याआधी मंगळवारी सुरक्षा पथकांनी दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये २५ लाखांचे बक्षिस लावलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली नावाच्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन इंसास रायफल, ३०३ रायफल आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.



भोपालपट्टनममध्ये तीन महिन्यांत ७८ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील भोपालपट्टनममध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा पथकांनी ७८ नक्षलवादी ठार केले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवणार असे जाहीर केले. ही घोषणा झाल्यापासून सुरक्षा पथकांच्या नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमा वाढल्या आहेत.
Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची